Prem kavita

0
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही. तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे" ती म्हणाली "पोळि करपेल, थांबा जरा राहू दे" तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर? "ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर?" "ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ" "पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ" "बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू" "नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू" "तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट" "बघा तुमच्या नादामधे...

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"

0
वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या...

Ek AAI

0
नीट वाचा …मनाला लागेल… पावसाळ्याचे दिवस सुरु होते.. पावसाने राज्यात थैमान घातले होते.. जणू ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे ढग जोर-जोरात रडत होते... पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.. घरातून बाहेर निघायची सोय नव्हती...आणि अशा परिस्थितीत अजय आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार ने घरी निघाले होते..... पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते, म्हणून अजय कार हळू चालवत होता.दोघांना घरी पोहचायला उशीर होणार होता.... आणि पाऊस त्यांच्या वाटेत अजून बाधा घालत होता. दोघेही वैतागलेलेहोते. पण निसर्गापुढे आजपर्यंत कोणाचे काही चालले आहे का??? हळू...

ती.......!

0
ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात, मी फक्त पाहात राहतो पाय आपोआप तीच्याकडे वळतात. सतत कसला तरी वीचार करत असते, काय माहीत तीच्या मनात काय चालते. हासतानाही ती खुप कमी हासु पाहते, पण हासताना तीच्या गालावर खळी पडते. ती उभी असते तीथेच कुठेतरी मी ही उभा राहतो, ती जवळ नसली तरी सहवास तीचा मला जाणवतो. खरच भीती वाटते मला तीच्या जाण्याची, माझ्या कवीतेत पुन्हा काळोख येण्याची. ती आली होती...

Maathi kavita

0
कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये, की आपल्याला त्याची सवय व्हावी ! तडकलेच जर हृदय कधी तर जोडताना असह्य यातना व्हावी !! डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये की पानाना ते नाव जड व्हावे ! अन् एके दिवशी अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे !! स्वप्नात कुणाला असंही बघू नये की आधाराला त्याचे हात असावे ! तुटलेच जर स्वप्न अचानक तर हातात आपल्या काहीच नसावे !! कुणाला इतकाही वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा ! अन् एके दिवशी आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा !! कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी...
 

Popular Posts