MARATHI PREM KAVITA

आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . .  .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"

असतात काही नाती अशी
शब्दात कधी न सांगता येणारी

असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी

असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी

असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत राहणारी

असतात काही नाती अशी
अमृता सारखा गोडवा जपणारी

असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम शिकवणारी 


रम्य संध्या


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

पाऊसाच्या झऱ्यात
नद्यांच्या खोऱ्यात
वाऱ्याच्या बोलात
होते किलबिल पक्ष्यांची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

हिरव्या नदीत नाहुनी
उंच पर्वतात खेळुनी
नभात जातो रवी निघुनी
येते हळूच वाट चंद्राची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

झुलते डुलते
मन हळूच फुलते
नं कळे काय पाहते ?
तर पाहते वाट तुझ्या येण्याची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

 अशी बायको मला हवी आई


अशी बायको मला हवी आई
अशी बायको मला हवी

चेहरा जिचा कोमल
हास्य जिचे उज्वल
पाहताच होई जिला
मनात माझ्या खळबळ

बोलणे जिचे ऐकताच
मन दु:ख विसरून जाई
अशी बायको मला हवी आई
अशी बायको मला हवी

रूप रंगाने गोरी असून
मानाने निर्मळ हवी
माझ्या आईची माझ्या वडिलांची
काळजी घेणारी हवी

सकाळी उठून, पूजा करून
जी सर्वांचा आशीर्वाद घेई
अशी बायको मला हवी आई
अशी बायको मला हवी

नखरा बिलकुल नको
हा पण हट्ट करणारी हवी
सर्वांशी ती पूर्णपणे
मिसळून राहणारी हवी

दुरून जिला पाहताच
मन शीतल होऊन जाई
अशी बायको मला हवी आई
अशी बायको मला हवी

अशी बायको मला हवी आई
अशी बायको मला हवी 










 प्रेम गोजिरे गोजिरे..
त्याला सुख-दुःख साजिरे...
माया आई ची अनंत ..
त्यात कसली तुला खंत..
बाप पाठीशी रे उभा..
असुदे रावणाची सभा..

माय तुझी रे हि माती
बाप तुझा शेतकरी
उन्हा-तनात तापून
तुला ठेवलं रे जपून
हृदयाच्या अमृताचा ठेवा
तुला जीवनभर पुरावा..
म्हणून झीझविल्या रे टाचा
तुला दिली मधुर वाचा..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे..
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत ..

घागरीने पाणी शेंदून
अखंड गगनाला भेदून
 पाजविले तुला अमृत
आयुष्य केल रे सुसंस्कृत
बापाच्या देहाची सावली
जशी विठ्ठल माउली
देऊन तुला सुख त्यानं
ओढलं अंगावर ऊन
काळा पडला तुझा बाप
सोसून जगाचा रे ताप
देऊन प्रीतीचा गारवा
त्याने भरला रंग हिरवा..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत

जखमेच दुःख भुलवून
तुझ आयुष्य दिल फुलवून
काट्या-कुट्यावर चालून
तुझसाठी फुलांचं अंथरून घालून..
त्यांनी सोसला रे ताप
म्हण त्यांना माय-बाप
करा आयुष्याच तप
त्यांच्या जीवानाला जप ..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत
बाप पाठीशी रे उभा
असुदे रावणाची सभा


 खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही

खंत आहे आज हृदयाला स्पर्श करणारी कुणीच नाही

एकटा आहे मी ह्या जगात

मला प्रेम करणारी ती असेल कि नाही...........

माझे हे गुलाब दरवळतच राहील

आहे कुठे ती माझी कल्पना

माझ्या फुलांचा सुगंध पाहील

खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही..




 प्रेम जेव्हा होते, तेव्हा काहीच माहिती नसते,
तो तिचा प्रियकर आणि ती त्याची प्रेयसी असते,

भेटतात कुठल्या वळणावर, मग पटकन नजर भिड़ते,
अगोदर मित्र बनतात आणि नंतर मांजर आडवी जाते,

मग गप्पागोष्टी आणि रुसव्या-फुगव्याचा चालू होतो खेळ,
उठल्यापासून ते झोपेपर्यंत फ़क्त होते विचारांची भेळ,

माहित असते दोघांना, की ते प्रेमात पडले आहेत,
कोण विचारेल अगोदर, पण घोड़े कुठे अडले आहे,

करून थोडीशी हिम्मत, मुलगा बाजीराव पेशवा बनतो,
मनात असुनही थोड़े झुलवत ठेवत त्याला, मस्तानीचा गेम चालू असतो,

शेवटी होकार मिळतो आणि प्रेम प्रकरण चालू होते,
प्रेमाला त्या साक्षी मानून शपथांची यादीच तयार होते,

तू नाही भेटलीस तर मी जिव देईन, असे बाण सुटतात,
तुझ्याशिवाय मी ही अधुरीच, हे ऐकून डायरेक्ट काळजात घुसतात,

हळुहळु सरकत हे प्रेम पुढे जाते,
मग लग्नाची वेळ शोधू पाहते,

जात पडताळणिचा मग, चालू होतो खेळ,
तो नाही माझ्या जातीतला, मग बसेल कसा मेळ,

दुसऱ्याच दिवशी ब्रेक अपचे, फरमान असे निघते,
बाबांना मी वचन दिले आहे, असे कारण असते,

हे ऐकून मुलाला, मोठा धक्काच बसतो,
इंटरवल नंतर मग, देवदास पिक्चर चालू होतो,

काही दिवस तिच्या आठवणीत, तो सतत रडत राहतो,
आता कोण येईल आयुष्यात माझ्या, याचीच वाट पाहतो,

परत कुठल्यातरी वळणावर, त्याला नविन धड़क बसते,
आता हीच माझी प्रेयसी, मग हृदयाची शिट्टी हळूच वाजते,

असे हे आजकालचे प्रेम, काय खोटे नि काय खरे,
कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केलातरी, बळी पडतातच सारे . . .  


एक साधा सुधा कवी
म्हाणून ओळख माझी नवी,
तुझ्यावर कवीता करून
आता भरली माझी वही.

तुझे ते हासु पाहून
डोळ्यांच्या पापण्या लवलवतात,
पाहतच राहील्यावर अपसुक
मला त्यावर कवीता सुचतात.

तुझ्यावर कवीता करताना
शब्द पावसा सारखे पडतात,
मी फक्त त्याना रचना देतो
ते शब्द आपोआप जोडतात.

कवीता लीहीताना तुझ्या
मनातले जाणु पाहतो,
तुला जे आवडेल असच
मी तुझ्यावर लीहीतो.

तु माझ्या कवीतेला
कधीही साद देत नाही,
असे असुनही मी कधी
नीराश होत नाही.

तुझ्या त्या नाकारण्याने
मी कधीही दुःखी नसतो,
कारण त्यातुनच तर मी
माझा कवीतेचा छंद जोपासतो.

माहीत असते मला
तु मझी नक्की होशील,
माझ्या या ओसाड कवीतेला
कधीतरी साद तु देशील.....