MARATHI VIRAH KAVITA

तरी मी असाच उभा होतो

अशांत समुद्रा सारखी
माझ्या मनाची दश्या
वाटलं आयुष्यात पुन्हा
उगवेल नव्या स्वप्नांची उषा

पण भरल्या हातातली वाळू
जशी सरकण निसटली
अन् आयुष्याची दौलत सारी
एका झटक्यात वाहून गेली

पुन्हा एकदा आयुष्य सावरेन
म्हणून वाट पाहत होतो
पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो

तिच्या मनातले भाव
मला समजताच आले नाही
अन् माझ्या आतली धडपड
तिने कधी ओळखलीच नाही

पैश्यानेच सगळं मिळतं
हे असंच मनात धावलो
नात्याची कडी कचकन तुटली
मी एकटाच घरात उरलो

आयुष्याच्या दुपद्री मार्गावर
मी एकटाच चालत होतो
पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो

पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो 

 ती असते कुठे
ती दीसते कुठे
शोधत राही मन माझे
जीथे कधी होते
अस्तीत्व तीचे.

काही माहीत नाही
कुठे गायब झाली,
मला न सांगता अशी
ती कुठे गेली.

तीला वाटले तीचे प्रेम
मी जाणले नव्हते,
तीची ओढ पाहुन सुधा
प्रेम मला कळले नव्हते.

मला फक्त थोडा
वेळ हवा होता,
कारण माझ्यासाठी हा
खेळच नवा होता.

माझ्या नकळत असे
तुझे ते चोरुन पाहने,
पण माहीत नव्हते तुला
मी तुझा पाठलाग करने.

तु माझ्या अयुष्यात
नवी पहाट बनुन आलीस,
भर उन्हात मला
चींब भीजवुन गेलीस.

आता अशी माझ्यापासुन
दुर तु जावु नकोस,
पंख नसलेल्या पाखराचा
खेळ पाहू नकोस..


 साथ-साथ...

हात घेउनी हातात
वाट चाललो कितीक
स्मरे आजही सुगंध
मेंदी खुललेला हात

उन्हातानात फिरलो
चांदण्यातही फिरलो
हात असाच हातात
नाही कधी दुरावलो

थोडे गोड थोडे कटू
किती आठवावे क्षण
खांद्यावर पाठीवर
हात निवाराया व्रण

हात गुंफले हातात
मन गुंतले मनात
दोन पायी एकवाट
सूर- ताल एकसाथ

एकटाच हालताना
हाता जाणवे पोकळी
सखे पुन्हा कधी भेटी
पुन्हा कधी हातमिठी......




 कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा

खूप खूप आठवतोस रे पुस्तकंच्या पानांत
जस तुला साठवलय रे मी माझ्या मनात

वेडी  हुवून मी चंद्र संगे बोलते रे कडू
कधी कधी तुझ्या आठवणीने येतंय रे रडू.

कधी कळतील रे तुला ह्या हृदयाच्या भावना
एकदा तरी माझ्या प्रेमाच्या हाकेला धावणा..

कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा......

तुझी वेडी प्रेयसी !!

"अस्मिता "



 असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात 


 तांदूळ निवडतांना-
------------------
तांदूळ निवडतांना,
तू तंद्रीतच असतेस, आपल्याच,
नजर लागलेली कुठे शून्यात...
'ह्यां'च्या काहीतरी उगीचच विचारण्याने
तू भानावर येतेस
आणि खजील होउन
खालचा ओठ दाताने घट्ट दाबुन धरत
गडबडीने निवडलेलेच तांदूळ
पून्हा निवडू लागतेस,
तेव्हा...................

किंवा,
रस्त्यातून जाताना,
तुझं लक्षच नसतं
भोवतीच्या रहदारीकडे...
कुणा उनाड पोराच्या धक्क्यानं
हातातलं सामान रस्तावर पसरतं,
सार्‍या नजरा चुकवत खालमानेनं
दोन्ही खांद्यांवरुन पदर ओढून घेत
रस्तावर पसरलेलं सामान
तू गोळा करू लागतेस
तेव्हा....................

किंवा,
तू घरात एकटी
बाहेर पाउस धूवांधार
लटक्या चाहूलीनं
तू दार उघडून बघू लागतेस
आळीच्या सीमेपर्यंत तूझी नजर
फिरुन परत येते, पण
दिसत नाही कुणीच !
चेहर्‍यावरच्या न उडालेल्या
तुषारांच्या निमित्त्याने
तू पदरानं डोळे टिपू लागतेस
तेव्हा.................

तेव्हा,
खरं सांग,
तुला तेच आठवत असतं ना,
तेच सगळं, पूर्वीचं,
माझ्या संदर्भातलं ?




 तू नक्की येशील बरं,
मला निरोप द्यायला.
माझ्या निपचित देहावर,
दोन सुगंधी फुले वाहायला.

(तुला काय? तू वाहशील दोन फुले)

पण तूच सांग, जाणवेल कसा,
सुगंध मला त्या फुलांचा?
निपचित पडलेला तेव्हा मी,
खरतरं नसेल या देहाचा.

तरी तू जवळ ये,
देहाला हात जोडण्याच्या नादानं.
बघशील चेहऱ्याकडे माझ्या,
दिसेल तुला हसू...

तू विचार करशीलच,
"मी हे काय बघतेय ,
मी बेवफाई केली असता,
तो अजून हसतोय. "

हो..हो मी हसलो ...मौनापुर्वी.
कारण...कारण मला माहित होतं,
तू येशील एकदा,
देह माझा जळण्यापूर्वी.

जाताजाता बेवफा सखे,
डोळ्यांत माझ्या पाहून  जा.

ठेवलेले जपवून पापण्यांनी
अश्रू दोन शोधून जा.
त्या अश्रूंत  चेहरा तुझा,
जाताना पाहून जा.

मी प्रवासी तुझ्या प्रेमाचा,
रात्रीच्या आभाळात जाणार.
आता पहिल तिथून तुला,
निरोप मला देऊन जा.
निरोप मला देऊन जा.

 ती गेली अन्


ती गेली अन्
मी माझाच न राहिलो
एकांतात बसून स्वतःशी
नेहमीच बडबडत राहिलो


ती आस तिच्या येण्याची
मनाला फार भेडसावत आहे 
डोळ्यापुढे तीच असावी
माझी हीच एक इच्छा आहे 


दोघांनी पाहिलेले स्वप्नं
मला सतत आठवत आहे
तिचे ते नाजूक शब्द
आजही कानी गुंगत आहे 


रित्या हातामध्ये माझ्या
तिचे हात मी पाहत आहे
अन् रोज संध्याकाळी मी
तिच्यासंगे फिरत आहे


हे स्वप्नं जरी असले माझे
मी स्वप्नातच फार खुश आहे
ती देवा घरी जरी गेली असली
तरी ती माझ्या जवळ आहे


 Please Read Poem Till The End...
You will love it...I assure you..
...,,कारण ती आलीच नाही
                                      रुपेश नाईक

सांज सरता सरता रात्र झाली
मनातील हुरहूर दाट झाली
भीतीनेही काळजात साद दिली
कारण ती आज नाही आली


न भेटता हि ती शंभरदा भेटते
न बोलताही शंभर गुज बोलते
तरीही अंतरात आर्त हाक दाटली 
कारण ती आज नाही आली


मी तिच्यावर इतके प्रेम करतो
ती देखील माझ्यावर तितकेच का करते ?
तरीही ग्वाही देण्यास कोणी नाही
कारण आज ती आली नाही

Flashback…………
आजही आठवते ती पहिली भेट
मी हसण्याच्या प्रयत्नात पण तू निघून गेलीस थेट
मी देखील तसा जिद्दी स्वभावाचा
रोज smile देण्याचा उचलला मी वसा
साप्ताह नंतर यश पदरात आले
जेव्हां तिचे "Hii” शब्द कानावर पडले...

"मी?" म्हणून मी साद दिला
तर "तूच" म्हणून प्रतिसाद आला
प्रश्न आला "आपण ओळखतो?"
"अग ओळखावेस म्हणून रोज तर हसतो!!"

नावावरून हाकलेली मग आमची नाव
अखेर तिने गाठला मैत्रीचा गाव
Coffee च्या वाफेत मग मनही तरंगले
तिच्या गप्पांत आपले स्वत्वच हरपले 

श्रावणाचा पाउस मन भिजवत होता
इंद्रधनुच्या रंगाने मैत्री सजावत होता
रात्रीचे call rates कमी होते झाले
Inverse proportion ने फोन वाढत गेले


मैत्रीच्या पावसात प्रेम अंकुरित होते
तिथेही असेच होते का म्हणून डोकावत होते
विचार शक्तीचा अंत होता..
अभ्यासही जरा मंद होता..

या मुली स्पष्ठ काही सांगत नाही..
सांगाव तर तास त्यांना मुळीच आवडत नाही..
१ एप्रिलला ठरवले आता प्रपोज करावे
नकारच आला तर एप्रिलफुल म्हणावे

दहा phone  केले एकही नाही उचलला
प्रपोजच्या  नादात   माझाच एप्रिल फुल होऊन बसला   
"एक विचारू" म्हणून केली सुरवात
"तुला जीवनसाथी कसा हवा?" वर समाप्त
"अगदी तुझ्यासारखा" उत्तर होते अपेक्षित
शाहरुख सारखा उत्तरल्या आमच्य माधुरी दीक्षित

मला तुझा फोन नाही आला तर कसबस वाटत
चिंतेने काळजात काहूर माजून आभाळ मनात दाटत
तू समोर असावी म्हणून मी झटतो
काहीतरी कारण काढून मग तुला भेटतो

मित्रांबरोबर असलो तरी वेध तुझेच असतात
मजनू देवदासच्या नावाने तेही मग घेरतात
तुझ  हसण तुझ बोलण सर्व मग आठवत
मित्रांसोबत असूनही विश्व माझ पालटत



प्रेम काय ते म्हणतात ते हेच का आहे?
नाही रे वेड्या  हा तुझ्या मनाचा खेळ आहे
तुझ्या भावना मी समजू शकते पण प्रेम नाही
कारण मी तुला त्या नजरेने कधीच पाहिले नाही

guilty वाटतय मला तू माझा बेस्ट friend आहेस
माझी चूक कोठे झाली ते मी  शोधते आहे
खिन्न मनाने घरी परतलो
 सुन्न मनाने झोपी गेलो
स्वप्नातही तिने माझा पाठलाग केला
sad songs ने मग सूरच धरला

Friendship day च्या दिवशी मग फोन आला
मैत्रीचा विरह म्हणे सहन नाही झाला
नात्यापेक्षा मी व्यक्तीला महत्त्व देते
Friend जरी तुझी मी girlfriend म्हणून येते
Three magical words चा मग स्वीकार झाला
Friendship day च्या दिवशी valentine साजरा केला

आपल्या Love story मध्ये एक प्रोब्लेम आहे
तू क्षत्रिय तर मी ब्राम्हण आहे
जातीभेद गेला तरी भेद मानले जातात
प्रेमियांच्या जीवनात व्याधी बनून येतात
आई बाबांना दुःख देवून  मी नाही येणार
अन क्षत्रियांचा जावई त्यांना नाही चालणार

"कस होणार रे आपलं?"प्रश्न तिला पडलेला
उत्तराच्या शोधात प्रश्नही फार थिजलेला
भातुकलीचा आपला डाव असाच मोडेल का रे ?
आपलीही प्रेम कहाणी अधुरीच राहील का रे ?
हळव्या दुःखी मनाने ती हि मग जवळ येते
कधीच दूर होऊ नये म्हणून मिठी मात्र घट्ट होते


मनातल्या यातना डोळ्यात मग उतरतात
गुलाबी गालावरून दवबिंदू ओघळतात
सुन्न होऊन सारे निशब्ध श्वास उरतात
शब्द मुके होऊन नजरा फक्त बोलतात
हातातील हाथ देखील वचनबद्ध होतात
रेशमाच्या बंधात मंगलाष्टके गातात
हळव्या मनाने मग हळुवार हाथ सुटतात
चातकापरी दुसरया  भेटीची वाट पाहतात

समाजाच्या चौकटीत चौकात बांधली जाते
दुसरया भेटीची तारीखही मग उलटून जाते
आसावलेल्या नजरा भेटीसाठी अतूरतात
असह्य वेदनापरी   नशिबावर त्या रुसतात


त्या वचन दिलेल्या स्थळी अजूनही वाट पाहतोय मी
तू आज नक्की येशील मनाची खोटीच समजूत काढतोय मी
शब्दांची तुझ्या उगाच उजळणी करतोय
तू दिलेली भेट मग हृदयाशी धरतोय.
लुकलुकणाऱ्या डोळ्यांची उघड झाप जाणवते
प्रत्येक श्वासागणिक तू जवळ वावरते


समाजाची आप्तांची सर्व बंधने झुगारून ये
गमावलेल्या श्वासास या श्वास हा मिळवून दे

ती आज आली नाही अन कधीच येणार नाही
कितीही वाट पहिली जरी
विरहाची हि घटी संपली नाही
अन कधीच संपणार नाही..... :( .