एकदा तरी सिविल इंजीनियर वर प्रेम करुन पहा

0

सिविल इंजीनियर म्हणजे काय ………

सिविल इंजीनियर म्हणजे फीरता वारा

 सिविल इंजीनियर म्हणजे वाहता झरा।
सिविल इंजीनियर  म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

 सिविल इंजीनियर   अंगावरील शहारा
       सिविल इंजीनियर रात्रीचा पहारा।
       फक्त  सिविल इंजीनियर आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

सिविल इंजीनियर जन हिताचा नारा
सिविल इंजीनियर आहे अनमोल हिरा।
सिविल इंजीनियर   म्हणजे धाक दराराv
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो सिविल    इंजीनियर
       जर असेल तो नितीनं खरा।।

सिविल इंजीनियर  प्रेम करुन पहा

एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी सिविल इंजीनियर वर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
सिविल इंजीनियरच्या यातना सोसुन पहा।।

     एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
          तुम्ही प्रेम करुन पहा……

Prem kavita

0

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थांबा जरा राहू दे"

तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?
"ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर?"

"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघा तुमच्या नादामधे भाजी झाली तिखट"

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।

"थोडासा…" त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"

"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

"बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…

माप ओलांडून आले होते, तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का विरघळलं?"

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"

0

वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.

खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेल. ...........नाना

Ek AAI

0

नीट वाचा …मनाला लागेल…
पावसाळ्याचे दिवस सुरु होते..
पावसाने राज्यात थैमान घातले
होते.. जणू
ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे
ढग जोर-जोरात रडत
होते...
पावसाच्या सरीवर सरी कोसळत
होत्या.. घरातून बाहेर
निघायची सोय
नव्हती...आणि अशा परिस्थितीत अजय
आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार
ने घरी निघाले होते.....
पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते,
म्हणून अजय कार हळू
चालवत
होता.दोघांना घरी पोहचायला उशीर
होणार होता.... आणि पाऊस
त्यांच्या वाटेत अजून बाधा घालत
होता. दोघेही वैतागलेलेहोते. पण
निसर्गापुढे आजपर्यंत
कोणाचे काही चालले आहे का??? हळू हळू
रात्र
झाली होती.ढगालेल्या वातावरणामुळे
काळोख
अगदी गडद झाला होता. आता सरळ
रस्ता संपून घात उतार
सुरु झाला होता. आणि अजय देखील
कार सावधानतेने चालवत
होता. मधेच काळ्याअंधाराला चिरत
एखादी वीज जणू
पावसाच्या प्रचंडतेची जाणीव अजय
आणि मेघाला करू देत
होती.....पावसाळ्याचेदिवस चालू
असल्याने गाड्यांचा वावर देखील
कमी झाला होता. घाट
उतारावरील
एका वळणावर अजय ने
गाडीला जोरदार ब्रेक लावला.....
जोरदार आवाज झाला....कार
थोडी घसरली... त्या धक्क्याने
कारच्या हेड लाईट बंद पडल्या... कार
देखील घाटाच्या मध्यावर
बंदं पडली....मेघाला क्षणभर सुचलेच
नाही काय झाले
ते.ती कावरी-बावरी होऊन अजय वर
ओरडली.... पण अजय ला काळोखात जे
दिसलं ते
मेघाच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं....
आणि चमकणाऱ्या विजांच्या पांढऱ्या प्रकाशात
त्याला एक
बाई
त्याच्या कार च्या पुढे
उभी असलेली दिसली.अंगावरील
कपडे फाटली होती, डोक्यातून रक्त येत
होते, हात-पाय रक्ताने माखले होते,
जणू त्या बाईचा आताच अपघात
झाला होता.....ती बाई कार पासून
थोड्या अंतरावर उभी होती.
आता तर मेघाचे देखील तिच्याकडे लक्ष
गेलं आणि भीतीपोटी मेघाच्या तोंडून
मोठी किंकाळी निघाली....
ती प्रचंड
घाबरली होती. अजय तिला समजावत
होता, पण तिचे घाबरणे कमी होत
नव्हते,तिला धाप
लागली होती.....ती बाई
धावतच अजय च्या कार जवळ
आली,मेघाने झट-पट
खिडक्यांच्या काचा वर घेतल्या.
इतक्यात त्या बाईचे रक्ताने माखलेले
हात कारच्या काचेवर
रेंगाळू लागले.....अजय
देखील मनातून घाबरला होता, त्याने
कार चालू करण्याचा खूप प्रयत्न केला पण
कार चालू झाली नाही. त्या बाईचे
रक्ताने
माखलेले हात
काचेवरती फिरताना पाहून
मेघा घाबरलेली होती. ..
तिला सावरणे अजयसाठी कठीण झाले
होते.... इतक्यात अजय
चे लक्ष त्या बाईच्या हातांकडे
गेले...त्या बाईचे दोन्ही हात
अजय आणि मेघा समोर जोडले गेले होते जणू
ती बाई मदत मागत होती.... अजय ने
माणशी काहीतरी विचार
केला आणि कार मधून घाबरतच
बाहेर
पडला... मेघा देखील
त्याच्या पाठोपाठ कार मध्ये
उतरली... इतक्यात त्या बाईने अजय पाय
पकडले आणि रडू
लागली.... रडत रडत बोलू लागली....,"
माझा अपघात झाला आहे
आणि माझी गाडी दरीत अडकली आहे
माझा ४
वर्षांचा मुलगा त्या गाडीत
अडकला आहे...
please
तुम्ही त्याला वाचवा ना...."आणि पुन्हा रडू
लागली....
मेघा ला मात्र हा भलताच प्रकार
वाटू लागल्याने मेघा खूप
घाबरली , आणि अजय ला तिथून निघून
जाऊ असे म्हणू
लागली..... पण अजय ने त्या बाईला मदत
करण्याचं पक्क केलं होतं...तो त्या बाई
ला म्हणाला,
'चला ताई,दाखवा मला कुठे आहे
तुमची कार,मी करतो तुम्हाला मदत',
आणि ती बाई पुढे चालू
लागली तसे तिच्या पाठी अजय
आणि मेघा देखील चालू लागले.... ते
दोघेही दरीच्या एका उंच
कड्यावर
पोहचले होते... अजय ला तिथून
रडणाऱ्या बाळाचा आवाज स्पष्ट येत
होता...वरून पावसाची तिरीप डोळे
उघडायची संधी देत
नव्हती... अशा मुसळधार पावसात अजय
त्या छोट्या जीवाचे
प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण
धोक्यात घालून एक-एक
पाऊल दरीत उतरत होता.....
दरी खोल अशी नव्हती पण
तरी जीवघेणी मात्र नक्कीच होती....
अजय जस-जसा त्या कार च्या जवळ
पोहचत होता...
तस-
तसा त्या मुलाचा रडण्याचा आवाज
तीव्र होत होता....
अजय आता त्या कार च्या खिडकीजवळ
आला होता...त्याला ते मुल तिथे
रडताना दिसत होते... त्याने
जवळून अंधारात चाचपडत एक दगड
उचलला अणी खिडकी ची काच फोडून
त्या मुलाला बाहेर काढले.... ते मुल
देखील अजय च्या हातात येताच रडायचे
शांत
झाले.... अजय ने त्याला दरीतून बाहेर
काढताना त्याला कारच्या चालकाच्
वर कोण तरी असल्याचे
जाणवले म्हणून त्याने
त्या मुलाला दरीतून बाहेर काढून
मेघा जवळ सोपवून
तो पुन्हा त्या दरीत
अडकलेल्या गाडीत नक्की काय आहे ते
पाहण्यासाठी दरीत
पुन्हा उतरू
लागला....कार जवळ गेल्यावर त्याने
त्या अपघातग्रस्त कार
मध्ये चालकाच्या सीट वर नीट
डोकावून पाहिले...... त्याने जे
पाहिले
त्याच्या हृदयाला धक्का देणारे
होते....त्या सीट वर
एका बाईचा मृतदेह पडला होता... अजय
नीट पाहिले तेव्हा तो अजूनच अवाक्
झाला.तो मृतदेह
त्याच
बाईचा होता....जि त्याच्याकडे
तिच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी मदत
मागायला आली होती.... त्याने
कसलाही विचार आणि बोभाटा न
करता तो दरीतून वर आल्यावर मेघाने
आजूबाजूला पाहिले
आणि अजयला विचारले कि, "कोण
होती ती बाई??? ती तुझ्याच मागे
आली होती, अचानक कुठे गेली...????"
यावर अजयने एकाच
उत्तर
दिले..... , "ती एक आई होती"

ती.......!

0

ती बोलत तर नाही
तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.
सतत कसला तरी
वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.
आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे..
Amit

Maathi kavita

0

कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी !
तडकलेच जर हृदय कधी तर
जोडताना असह्य यातना व्हावी !!

डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानाना ते नाव जड व्हावे !
अन् एके दिवशी अचानक
त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे !!

स्वप्नात कुणाला असंही बघू नये
की आधाराला त्याचे हात असावे !
तुटलेच जर स्वप्न अचानक तर
हातात आपल्या काहीच नसावे !!

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा !
अन् एके दिवशी आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा !!

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी !
अन् त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !!

कुणाचे इतकेही एकू नये की
कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा !
अन् आपल्या ओठातुन मग
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा !!

कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी !
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळखळ अश्रू जमवी !!

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे "मी पण " आपण विसरून जावे !
त्या संभ्रमातुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे !!

पण.....

कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे !
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घुमावे !!

On 05-Mar-2013 5:11 PM, "Amit Shidurkar" <shidurkar007@gmail.com> wrote:

αƒтєя 1 уєαяѕ σƒ вяєαк υρ....! ι ƒσυη∂ α мѕg ιη му ιηвσχ... ∂αт мѕg ωαѕ му нєя... ѕнє ωяσтє.... нω ѕ υ ∂єαя . αяє υ ƒуη.... . . му ƒιяѕт єχρяєѕѕιση αƒтєя яєα∂ιηg ∂αт..... ωαѕ ѕнσ¢кιηg..... . . тнє gιяℓ..... ωнσм ι ηєνєя ωαηт 2 яємємвєя..... нαѕ мєѕѕαgє∂ мє......! . ωнσℓє ραѕт gєт ѕρℓαѕнє∂ ιηѕι∂є мумιη∂ тнє тιмє....ωє нα∂ ѕρєηт 2gєтнєя..... . тнαт тιмє.... ωнη ωє ∂яєαмт σƒ συя вєαυтιƒυℓ ƒυтυяє. . :'( :'( . тнє тιмє...... ωнη ѕнє ѕαι∂ мє, вαву......ωє ℓℓ ρяσνє ∂ιѕ ωσяℓ∂.....тнαт тяυє ℓσνє яєαℓℓу єχιѕтѕ.......:' ( . ι jυѕт ѕтαятє∂ ¢яуιηg.....ву яємємвєяιηg тнαт.....:'( αη∂ ѕυ∂∂єηℓу ι gσ ραѕѕ ву нєя ρяσƒιℓє......, тнєяє ι ѕαω...... нєя ѕтαтυѕ..... ιт ωαѕ ωяιттєη тнαт.. ''ιη α яєℓαтισηѕнιρ" ωιтн....ηαмє σƒ ∂αт gυу.....:'( . αη∂ ѕαω нєя ωнσℓє ρяσƒιℓє..... ιт ωαѕ ѕєєм ℓιкє....ѕнє ℓσνє∂ тнαт gυу νяу мυ¢н.... . . вυт ι ωαηтє∂ тσ тєℓℓ нєя....... тнαт нσω мυ¢н ι ℓσνє нєя......:'( вυт, ησω тнє тιмє нα∂ ¢нαηgє∂....:'( . . му нαη∂ ωєηт тσ кєувσαя∂. .:'( ƒιηgєяѕ ση тнє кєуѕ.....
ι ωяσтє..... . υмм, ηу¢ 2 ѕєє υ нαρρу ωιтн нιм.....! . . ωιтн ѕмιℓιηg ѕмιℓєу...... . αη∂ gινє нєя вℓєѕѕιηgѕ...ƒσя нєя яєℓαтιση... ѕнє тσσ ωαηтє∂ 2 ѕαу ѕмтнιηg.....! . . вυт ι кηω.........ι ѕнυ∂ єѕ¢αρє ƒям нєя ℓуƒ...... αѕ ι ∂ηт ωαηт.....тнт συя ραѕт ѕρℓαѕнєѕ нєя ηєω яєℓαтιση, . ι ѕιмρℓу ѕαι∂...... ωσω, ηу¢ 2 ѕєє υя мѕg....м ƒ9 αη∂ νяу нαρρу ωιтн му ηєω gƒ...... αℓтнσυgн ι кηω, ι ѕнυ∂ ηт ѕρσкє тнт ℓιє..... . вт 2∂αу αℓѕσ нєя нαρριηєѕѕ...... ιѕ му ƒιяѕт ρяєƒєяєη¢є:'( . уєѕ ., му нєαят ѕтιℓℓ вєαтѕ 4 υ.... ♥

Rojnishi of tanmay bapat.

0

तन्मय बापट
चौथी अ
रोजनिषी
.........................................
७ सप्टेंबर २००८

आज मला कंटाळा आला. मी बाबाला म्हणाला मी शाळेत जाणार नाही. बाबा म्हणाला नको जाऊस, खाली गाड्या पुसायला लागतील कॉलनीतल्या लोकांच्या. बाबा वाईट् आहे. असंच म्हणतो कायम. बाबा मला आवडत नाही. मला म्हणाला की मी आता मोठाझालाय, आता मी शुरवीरासारखा एकटा झोपायला पाहिजे. मला तो एकटा पाडतो. तू झोप की शुरवीरासारखं दुस-या खोलीत. मी आणि आई झोपु एका खोलीत. आई पण बाबाच्या बाजुने बोलते. मी आजीला सांगणारे. मला आजीच आवडते. मी आज दाबेलीखाल्ली. गणिताचा गृहपाठ राहिला आहे.
आता झोपेन एकटा. बाबाच्या आईला उद्या फोन करेन आता.
.............................................

२ ऑक्टोबर २००८
आजी आली आहे. मला सायकल घेउन देणार आहे ती ह्यावेळेला. बाबा नको म्हणाला पण आजी देणारे. बाबा म्हणाला, तनु लहान आहे.. मला कळतच नाही काही बाबाचं. मी पक्यासारखी सायकल घेणार आहे, गिअरवाली.. झूम..झूम शाळेत जाता येईल. रिक्षानीजायला जाम बोर होतं. त्या स्टुपिड मुली काहीही बडबडत असतात. त्या सायलीला बहिण झालीये म्हणे नवीन. पकाऊ..त्याबद्दलच सांगत असते. आणि सगळ्या मुली क्युट, स्वीट, कित्ती गोड म्हणत असतात. मी आणि आलोक त्यांच्या बॅगांचे पट्टे तोवर बांधुनठेवतो. तेवढीच मज्जा येते. मी झोपतो आता आजीजवळ.
................................................

३० ऑक्टोबर २००८
आज काहीतरी घरात सॉलिड झालं आहे. मला कळलं नाही नीट. मी खेळुन आलो तर कोणी मला हात-पाय पण धुवायला सांगितले नाहीत. मी बाबाच्या लॅपटॉपवर जवळ बसलो तरी त्याने लक्ष दिलं नाही. जाम काहीतरी झालं होतं. आई आतल्या खोलीत होती.बाबा आणि आजी बाहेर.. आई बाहेर आली तेव्हा वेगळीच दिसत होती. रडल्यासारखी. मी सायलीला परवा ढकललं तेव्हा सायली अशीच दिसत होती. आजी लगेच मला घेउन आत आली. तनु आता ७ वर्षाचा आहे, कळतं का तुला? असं काहीतरी आई बोलतहोती. बाबा काय बोलत होता ऐकु येत नव्हतं. काय झालं असेल? आजी पण काही सांगत नाही नीट.
.....................................................

९ नोव्हेंबर २००८
आज मी आणि आईने मज्जा केली खुप. आई शाळेत घ्यायला आली होती. मग आम्ही संभाजीपार्कात जाउन भेळ खाल्ली. तिच्यातल्या २ पाणीपु-यापण मी खाल्ल्या. नवीन टीशर्ट घेतले २. आईस्क्रिम खाल्लं. आणि हे सगळं झाल्यावर ती विचारत होती की बर्गरखायचा आहे का मेकडोनल्डमधला. मी नाही म्हणणार होतो पण मग आम्ही गेलो. आई वेगळीच वागते आता काही दिवस. मला काहीही विचारत होती. मला म्हणाली तुला एकट्याला झोपायला भीती वाटते ना? तर तुझ्याबरोबर झोपायला कोणी आलं तर?काहीही बोलत होती. पण मज्जा आली आज. आजीने अजुन सायकल आणली नाही आहे. बहुतेक आम्ही रविवारी जाउ.
......................................................

१३ नोव्हेंबर २००८
मी कोणाशीही बोलत नाही आहे. राग आलाय मला सगळ्यांचाच. सगळे खुप वाईट आहेत. मी नाही वागत का शहाण्यासारखा? मी त्रास देतो का कधी त्यांना? मी शाळेत जातो. मी ते सांगतात ते सगळं ऐकतो. सायकलचा हट्ट पण मी केला नाही सारखा सारखा.आजी आपणहुन म्हणाली मी देते म्हणुन. आणि आता हे म्हणतात की ते अजुन एक लहान तनु घेउन येणार म्हणे. मी त्याला येऊच देणार नाही. आला तरी मी त्याला माझ्या खोलीत घेणार नाही. माझं घर आहे. माझे आई-बाबा आहेत. हा कोण नवीन येणारआता माझ्या घरात? साऊ परवाच सांगत होती तिची आई साऊ ला जवळ घेत नाही जास्त त्या बाळालाच जवळ घेते सारखी. एक बाळ असताना दुसरं बाळ का आणतात?
.........................................................

२९ नोव्हेंबर २००८
मी आज एकटा रिक्षापर्यन्त गेलो. मी आज माझ्या बुटांची लेस स्वतः बांधली. आता कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होणारच नाही ना. मी सवय करुन घेणार होतो पण सायली म्हणाली की इतक्यात नाही येणारे तुमच्याकडे बाळ. मे महिन्यात येईल असंतिची आई म्हणत होती. तिच्या आईला काय माहित? आमचं बाळ आहे. आम्हाला हवं तेव्हा हॉस्पिटलात जाउ आणि आणु आम्ही बाळ. आजी म्हणाली उद्या जाऊ सायकल आणायला. मी गंमत करणारे. माझ्याकडेपण खुप पैसे आहेत. मी आजीला पुस्तक घेउनदेणारे तिनी सायकल घेऊन दिल्यानंतर. उद्या आजी झोपली की मी पिगी बॅन्क उघडेन. आजीच माझी लाडकी आहे.
..........................................................

४ डिसेंबर २००८
बाबा हल्ली उशिरा घरी येतो आणि आई खूप लवकर घरी येते. ती आता जास्त क्लास घेत नाही. आई माझी चित्रकार आहे. ती म्हणाली आहे की ती माझी खोली सजवुन देणारे. मला माहित्ये ती खोली माझ्यासाठी नाही, नवीन बाळासाठी सजवणारे. आजीनीपरवा सायकलच्या दुकानातुन परत येताना मला सांगितलं की आता आईला त्रास द्यायचा नाही. तिच्याकडे हट्ट करायचा नाही. तीला कामात मदत करायची. पण मी कधीच आईला त्रास दिला नाही. आलोक म्हणतो लहान भाउ आल्यावर मोठा भाऊ आई-बाबांनावाईट दिसायला लागतो. साऊने पण तसच सांगितलं होतं. पण माझी आई चांगली आहे. ती असं वागणार नाही. बाबाचं माहित नाही. मी आज एकट्याने सोसायटीच्या गेट्पर्यंत सायकल चालवली.
...........................................................

२४ डिसेंबर २००८
आज आईचे पाय खूप दुखत होते. मी विचारलं चेपुन देऊ का? तर जवळ घेत म्हणाली. नको रे तन्या, तू खेळायला जा. मी गंमत केली. कोणाला न सांगता माझ्याकडचे पैसे घेउन सायकल ने सोसायटी बाहेर गेलो. एकट्याने रस्ता क्रॉस केला आणि पाय दुखायचाऔषध घेउन आईला आणुन दिलं. आई तर रडायलाच लागली. मला कळलं नाही काहीच. मग म्हणाली तनू मोठा झाला माझा. मी मोठा झालोच आहे. आणि आजीचा ऐकायचं असं ठरवलं आहे. आईला त्रास नाही देणारे मी. आईने बाबाला सांगितलं तेव्हा बाबानेपण कौतुक केलं. बाबा म्हणालाय ह्या रविवारी पिक्चर बघायला जाऊ. बाबा पण तसा चांगला आहे.
................................................................

१६ जानेवारी २००९
बाळ कसं होतं? मला कोणी सांगितलंच नाही आज मी सगळ्यांना विचारलं. मला आणि आलोकला वाटायचं हॉस्पिटलमधे मिळतं बाळ. पण सायली म्हणाली आईच्या पोटातुन येतं बाळ. पोटातुन कसं काय येईल? सायली येडी आहे. माझ्या आईचं पोट कापतील ते?आईला काही होणार नाही ना माझ्या? आईला हल्ली कुठे कुठे दुखतपण असतं. मला वाईट वाटायला लागलं आहे. मला आई आवाडते माझी. प्लीज देवा, माझ्या आईला काही करु नकोस. मी त्या नवीन बाळाशी चांगला वागेन. रविवारी सोसायटीतल्या सुरेखाकुत्रीला ५ पिल्लं झाली. बाबा म्हणाला आपल्याकडे एकच बाळ येणारे. मी घाबरलोच होतो. ५ भाऊ-बहिणी झाले असते तर आम्ही "मोठे कुटुंब- दु:खी कुटुंब" झालो असतो.
.............................................................

२८ जानेवारी २००९
बाबाने सांगितलं की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी देव बाळ देतो आई-बाबांना. जर त्यांनी चांगला वाढवलं पहिल्या बाळाला तर अजुन एक बाळ देतो. म्हणजे देवाला वाटलं माझे आई-बाबा मला चांगलं वागावतात तर! बाळ पोटातुन बाहेर येतं. पण बाबाम्हणाला आईला काही होणार नाही. मग ठीक आहे. पण बाळ पोटात जातं कसं हे विचारलं तर म्हणाला आजीला विचार. बाबा इतका मोठा झालाय तरी त्याला खुपश्या गोष्टी माहित नाहीत.
आजी शहाणी आहे. आजीने बरोबर सांगितलं. माझ्या डोक्यात बुद्धी आहे. कुठुन गेली कळलं का? नाही ना. तसचं बाळ येतं. आजीने बाबांना काही शिकवलं नाही बहुतेक. बाबाला तर हनुमान स्तोत्रपण पुर्ण येत नाही. पण तो कठीण कठीण श्लोक म्हणु शकतो.
..................................................................

६ फेब्रुवारी २००९
सायलीची आईपण येडीच आहे सायलीसारखी. तिने सायलीला सांगितलं की प्रसाद खाल्ल्यामुळे बाळ होतं. हनुमानच्या आईने नाही का आकाशातुन पडलेला प्रसाद खाल्ला आणि मग हनुमान झाला. मलाही आता वाटतं आहे तसं. आलोक तर घाणेरडा आहे. तोघाण काहीही सांगतो पिक्चरमधल्यासारखं. मी आणि सायली बोलत नाहीयोत त्याच्याशी. काल आई विचारत होती, भाऊ झाला तर नाव काय ठेवायचं? मी आईला सांगितलं, भाऊ झाला तर म्हणजे काय? मला भाऊच हवा. मुली नाही आवडत मला. बावळटअसतात. मी विचार करतोय आता भावाच्या नावासाठी. सचिन किंवा राहुल किंवा रिहितीक किंवा शाहिद असं काहीतरी पाहिजे. महेन्द्र नाही आवडत नाव मला आणि धोनी तर आडनाव आहे.
.......................................................................

२९ मार्च २००९
मी आणि बाबा आणि आजी आम्ही तिघंच आहोत आता. आई मुंबईला गेल्ये तिच्या आईकडे. मी पण जाणार होतो पण माझी वार्षिक परीक्षा आहे. आईला सांगितलं आहे मी, मी आल्यानंतरच बाळ आण. आई म्हणाली मे महिन्यात आणेल. साऊची आई हुशार आहेम्हणजे, ती म्हणाली होती. बाबा आणि मी खुप धमाल करतो. आम्ही दोघं परवा सकाळी सायकल चालवत ग्राउंडवर गेलो होतो. बाबा खुप मस्त आहे. तो विडीओ गेम पण घेउन देणारे. बाबा असा वेगळा वागतो ना कधी कधी कळतच नाही. आजीपण माझ्याआवडीच्याच भाज्या करते. आईसारखं वांगं नाही खायला लावत. पण खरं सांगु? मला आईची आठवण येते. मला आईच्या कुशीत झोपायचं आहे. तिचे पाय दुखत असतील तर तिथे तिला कोण औषध देत असेल? परीक्षा झाली की त्या च्या त्या दिवशी मी मुंबईलाजाणार.
.................................................................

५ एप्रिल २००९
माझी परीक्षा संपली. मला आजच मुंबईला जायचं होतं पण बाबा वाईट आहे. तो म्हणाला रविवारी सोडेल तो मला मुंबईला. मी आईला रोज फोन करतो. आईपण मला करते फोन. आलोक मला म्हणाला. बघ बाळ यायच्या आधीच आई लांब गेली तुझ्यापासुन.असं खरचं असेल का? आई माझ्यावर प्रेम करेल ना? मला रडुच येतं रात्री झोपताना. सायलीची बहिण साऊचे केस ओढते आता आणि सायलीने तिला मारलं तर तिची आई सायलीलाच ओरडते. माझा भाऊ मारकुटा असेल तर? मला कोणी धड कसलं उत्तरच देतनाही. कोणालाच काही माहित नाही.
......................................................................

१० मे २००९
मी मुंबईत आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमधे बाळ मिळत असताना आई मुंबईला का आली? मी आईबरोबर आज हॉस्पिटलमधे गेलो होतो. तिथे २-३ बाळं पाहिली ठेवलेली. किती लहान होती. छोटी एकदम. सुरेखाच्या पिल्लांसारखी क्युट. मी क्युट म्हणालो तर आईहसली. पण बाळं खरचं क्युट असतात. तिथल्या डॉक्टरकाकु मला म्हणाल्या. काय मग दादा होणार ना तू आता? मज्जा करणार ना? . मला असली धमाल वाटली. इतके दिवस लक्षातच नव्हतं आलं. मी दादा होणारे.'तन्मय दादा' म्हणेल मला माझा भाऊ. कसलंभारी. मला खूप आनंद झाला आहे. मी आईला सांगितलं मी चिन्मय नाव ठेवणारे भावाचं आणि त्याला चिनु म्हणायचं. चिनुला मी सायकलवर शाळेत नेईन.
.....................................................................

१ जुन २००९
ढीपाडी डिपांग.. ढीपाडी ठिपांग... मी दादा झालो. मी तन्मय दादा झालो. आम्हाला बाळ झालं आहे. मुलगा बाळ. गोरं आहे एकदम सायलीसारखं. मी काल त्याच्याशी बोलत होतो तर हसला तो. आणि त्यानी बोटचं धरलं माझं.
त्याला मी आवडतो. मला तो आवडतो आणि आई-बाबांना आम्ही दोघं आवडतो. जरा मोठा झाला तो की मी त्यालाच विचारणारे तू कसा झालास नक्की? मला माझा जन्म आठवत नाही. चिन्या विसरायच्या आधीच त्याला विचारणारे.

 

Popular Posts